Sunday 19 December 2021

सल

 सल घेऊन कोणाकडे जावं तर तेच रक्तबंबाळ आहेत...

सय आली कोणाची तर त्या मनांची दारे-खिडक्या बंद आहेत..

ठाव लागतो का बघावे डोकावून तर तळ नव्हे प्रतिबिंब माझेच दिसते..

डाव नवीन मांडायचा मनसुबा हरवणाऱ्या सोंगट्यांत घरंगळताना पहावे लागते..

सरळ जाऊ , कशाला वळणे हवीत? म्हणेपर्यंत रस्ताच वळतो.

उतार सोपा ठरेल म्हणेपर्यंत परत नवा चढ लागतो.

क्षणभंगुर आयुष्य असलं तरी संपेपर्यंत कुठे संपणार आहे?

खूप करायचंय अजून म्हणणारे अचानक नाही से होत आहेत. 

वाचायचंच नाही म्हणून मिटता येतात तशा पापण्या कानांना सुद्धा असायला हव्यात , हवं तेवढंच ऐकू येतं .. अशी उत्क्रांती काही कानांत झाली आहे म्हणे!!

आपण फक्त उगणारा दिवस बघायचा असा आशावाद स्वतः ला बजाऊन सांगायचा. 

मावळतीचे रंग दिसले तरी त्यात प्रेमभरला शुक्रतारा शोधायचा.


Good night

No comments:

Post a Comment