#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१२
गोवर्धनदास यांनी बाबांना शांत रहायला सांगितलं. मिटिंगमध्ये फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं. ना चिडायचं ना इमोशनल व्हायचं ना अपराधी भाव मनात ठेवायचे! सगळं ऐकून 'ठिक आहे, विचार करून कळवतो.' एवढंच बोलून यायचं.
काकांनी सुद्धा बाबांना जवळपास असाच सल्ला दिला. डोकं थंड ठेव हा मुख्य सल्ला होता.😀
मिटिंगला बाबांबरोबर गोवर्धनदास यांचे एक स्नेही गेले होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. ते आर्किटेक्ट आणि वकील होते. मांजरेकरांच्या पुतण्याने 'आमचं कुटुंब त्यांच्या (मांजरेकर मामांच्या) एकट्यावर अवलंबून आहे' असा दावा केला. तसंच कामगार जर कामावर ..साईटवर असताना जखमी झाला , मृत्यू पावला वगैरे तर मालकावर /कंपनीवर थेट जबाबदारी असते. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागते. कायद्यात तशी तरतूद आहे. असं पुतण्या चं म्हण्णं होतं. त्याच्या वकिलाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई ची मागणी केली.
बाबा म्हणाले की त्या दिवशी ते घरी कसे पोहचले ते त्यांचं त्यांना माहीत! हात पाय कापत होते. हृदयाची धडधड दुप्पटीने होत होती. संध्याकाळी काका , बाबा खूप वेळ बोलत बसले होते. पुढचे अनेक दिवस, महिने काका गिरगावात खूप उशिरा पर्यंत थांबायचे. पार शेवटच्या गाडीने बोरीवलीला परत जायचे. सतत बाबांबरोबर थांबायचे. नंतर एकदाच काकांनी बोलता बोलता म्हटलं की 'मी थांबाचो ...याचा काय भरवसा? भलतं सलतं डोक्यात घेतलंन , इकडे तिकडे निघून गेला ...त्याला आपल्या डोळ्यासमोर गुंतवून ठेवला पाहिजे एवढं माझं मी ठरवलं होतं.'
नंतर या सगळ्या गोष्टी वर गोवर्धनदास , त्यांचे स्नेही , कंपनी (ज्यांची मुख्य साईट होती) चा एक लिगल अॅडव्हायझर आणि पै काका पण यांच्या चर्चा झाल्या. कोर्टात न जाता बाहेर सेटलमेंट झाली तर बरं ...यावर सगळ्यांचं एकमत होतं.
पुतण्या खोटं बोलत होता हे नक्की. कारण मांजरेकर मामांची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ते स्वत:च्या घरात दोन मित्र म्हणा, गाववाले म्हणा .. यांच्या बरोबर रहात. तेच लोक अंत्यसंस्काराला पुतण्या व भावा बरोबर होते. पुतण्याचा आणि भावाचा जेवढ्यास तेवढाच संबंध होता. पण माझे बाबा 'हिरो' ..पुतण्या 'व्हिलन' ..मग कोर्टात हिंदी सिनेमा इष्टाईल आरोप-प्रत्यारोप होऊन बाबा जिंकले ..असं व्हायला आयुष्य काही हिंदी सिनेमा थोडाच होता? 😄
कोर्टात काहीही होऊ शकतं. केस कितीही वर्ष चालू शकते. जेव्हा मांजरेकरला अटॅक आला तेव्हा काम बंद होतं, लंच ब्रेक होता. त्या दिवशी मुळातच कामाला हातही लावला नव्हता मांजरेकरांनी. अर्धा दिवस उलटला आहे..रोज पूरा मिळणार नाही , तुम्ही आराम करा , उद्या या ...वगैरे संवाद सर्वां समक्षच झाला होता. ही बाबांसाठी मोठी जमेची बाजू होती. तरीही मनस्ताप टाळण्यासाठी समझौता करण्यावर भर द्यायचं ठरलं.
पुतण्याने मागितलेली रक्कम देणं तर निव्वळ अशक्य अशक्यच होतं. बाबांना जीवाला तोच घोर लागून राहीला होता. दोन्ही मुलींची शिक्षणं बाकी , आई तर निवृत्ती घेऊन बसली होती! व्यवसायाचा पसारा मांडला होता. दिवसा गणिक गरजा वाढत होत्या.. महागाई वाढत होती.
त्यांचं मनस्वास्थ्य साफ बिघडलं. ते पूर्ण नास्तिक होते वा काय मला माहित नाही ..पण जप , नामस्मरण केल्याने आणि देवाचा धावा केल्याने संकट टळत नाही हे ज्याला पक्कं ठाऊक आहे ..असा प्रचंड practical माणूस होता तो!!! अशा प्रसंगात देवावर विश्वास नसणाऱ्यांची खूप खूप मोठी परीक्षा असते. सगळी कडून आधारच नाहिसा होतो ...ज्या स्वत:वरच्या दूर्दम्य विश्वासावर सगळं उभं केलेलं असतं तो विश्वासच जर हलला गेला तर काय होईल?
त्यांची सिगरेट वाढली , चहा वाढला. वजन घटलं , केसही पांढरे होऊ लागले भरभर. कोणा कोणाला चालल्या प्रकाराची कुणकुण लागली की त्यांचे चौकशी ला फोन येत. असे फोन घेतले , बोललं की त्यांना अधिकच नैराश्य येई.
गोवर्धनदास काकांच्या सल्ल्या प्रमाणे ते रोजच दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना लिहून ठेवत होते. मग बाबांनी त्याच चोपडीच्या (बिझनेसवाले लोक बरेचदा वही ला (notebook) 'चोपडी' म्हणतात.😄 ) शेवटच्या पानावर स्वत: साठी काही तरी सकारात्मक लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ : माझ्यावर पाच पैशांचही कर्ज , उधारी आज घडीला नाही.
Yess ..😀 this was a positive thought 👍
मग यात भर पडू लागली , माझा भाऊ माझी बहीण मला धीर देतात. माझी बरीचशी माणसं (😢) अजूनही माझ्या बरोबर आहेत...
माझी पत्नी समजूतदार आहे, माझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे.
मुली शिक्षणात हुशार आणि समंजस आहेत. वगैरे!!
त्यांनी या काळात 'positive thinking'. या विषयावरील पाच पंचवीस पुस्तकं वाचून काढली. सतत मनाला उभारी मिळावी म्हणून जे करता येईल ते केलं. आम्हाला 'लघुरुद्र घाला , उपवास धरा , गुरू शोधा' असे पुष्कळ सल्ले मिळाले. आई-बाबांनी या प्रेमळ सल्ला देणाऱ्यांची मने कधीच दुखावली नाहीत पण आई म्हणते ..आमचं अशा गोष्टींत मनच रमलं नाही..कराव्याशा वाटल्याच नाहीत तर जूलुमाचा रामराम हवा कशाला? नाही म्हणायला आई दर शुक्रवारी काळ्या रामाच्या देवळात तेवढं जायची. एक गजरा देवीला वहायची.
बऱ्याच मिटिंगज् झाल्या. गोवर्धनदास यांचे स्नेही हुशार होते. त्यांनी एका फार मोठ्या आणि नावाजलेल्या वकिलांच्या वांद्रे येथील मोठ्या आॅफिस मधे फायनल मिटिंग ठरवली. पुतण्या , त्याचा वकील , बाबा आणि ते स्नेही असे मिटिंगला गेले. बाबा म्हणाले...तो माणूस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास!! एक एक करत तो पुतण्याच्या वकीलांशी कायद्याच्या अगम्य भाषेत बोलत होता...त्यांना निरुत्तर करत होता.कोर्टात जाणं तुम्हाच भारी पडेल , त्यापेक्षा अनुकंपा म्हणून खरे देऊ करत असलेली रक्कम चर्या निवांत !! हे सहज गळी उतरत होता त्यांच्या!! त्या कायदेशीर भाषेतलं मला काही जरी कळत नव्हतं तरी मला अचानकच अवघड पेपर सोप्पा वाटायला लागला! इतके दिवस उगाच मी चिंता केलीसं वाटून मला मानेवर केस उभे राहिले. माझ्या ही नकळत माझे ओठ छोटं हसू येऊन ताणले गेले आणि डोळेही चुरचुरीत होते! 😄
पुतण्या व त्याचा वकील तोंड पाडून होते पण तरी पैशांवर तडजोड ही केलीच त्यांनी!! पाच लाखावरून थेट पन्नास हजारांवर 😂😂 त्यांनी सगळं आवरतं घेतलं.
वांद्र्याच्या या (बहुतेक कुलकर्णी साॅलिसिटर्स ..नाव नक्की आठवत नाही) वकीलांनी या तीन तासांच्या मिटिंगची सात हजार रुपये फी घेतली. 😄
बाबांनी मग काही दिवस चक्क नोकरी केली ...त्यांच्या माणसां सकट त्यांना नोकरी दिली तरी कोणी? मग तिथे पुढला वाढदिवस कसा साजरा झाला? 😂😂😂 हा किस्सा ऐकायचा आहे का तुम्हाला?
#PradnyaSubodhAhire.
#भाग१२
गोवर्धनदास यांनी बाबांना शांत रहायला सांगितलं. मिटिंगमध्ये फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं. ना चिडायचं ना इमोशनल व्हायचं ना अपराधी भाव मनात ठेवायचे! सगळं ऐकून 'ठिक आहे, विचार करून कळवतो.' एवढंच बोलून यायचं.
काकांनी सुद्धा बाबांना जवळपास असाच सल्ला दिला. डोकं थंड ठेव हा मुख्य सल्ला होता.😀
मिटिंगला बाबांबरोबर गोवर्धनदास यांचे एक स्नेही गेले होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. ते आर्किटेक्ट आणि वकील होते. मांजरेकरांच्या पुतण्याने 'आमचं कुटुंब त्यांच्या (मांजरेकर मामांच्या) एकट्यावर अवलंबून आहे' असा दावा केला. तसंच कामगार जर कामावर ..साईटवर असताना जखमी झाला , मृत्यू पावला वगैरे तर मालकावर /कंपनीवर थेट जबाबदारी असते. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागते. कायद्यात तशी तरतूद आहे. असं पुतण्या चं म्हण्णं होतं. त्याच्या वकिलाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई ची मागणी केली.
बाबा म्हणाले की त्या दिवशी ते घरी कसे पोहचले ते त्यांचं त्यांना माहीत! हात पाय कापत होते. हृदयाची धडधड दुप्पटीने होत होती. संध्याकाळी काका , बाबा खूप वेळ बोलत बसले होते. पुढचे अनेक दिवस, महिने काका गिरगावात खूप उशिरा पर्यंत थांबायचे. पार शेवटच्या गाडीने बोरीवलीला परत जायचे. सतत बाबांबरोबर थांबायचे. नंतर एकदाच काकांनी बोलता बोलता म्हटलं की 'मी थांबाचो ...याचा काय भरवसा? भलतं सलतं डोक्यात घेतलंन , इकडे तिकडे निघून गेला ...त्याला आपल्या डोळ्यासमोर गुंतवून ठेवला पाहिजे एवढं माझं मी ठरवलं होतं.'
नंतर या सगळ्या गोष्टी वर गोवर्धनदास , त्यांचे स्नेही , कंपनी (ज्यांची मुख्य साईट होती) चा एक लिगल अॅडव्हायझर आणि पै काका पण यांच्या चर्चा झाल्या. कोर्टात न जाता बाहेर सेटलमेंट झाली तर बरं ...यावर सगळ्यांचं एकमत होतं.
पुतण्या खोटं बोलत होता हे नक्की. कारण मांजरेकर मामांची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ते स्वत:च्या घरात दोन मित्र म्हणा, गाववाले म्हणा .. यांच्या बरोबर रहात. तेच लोक अंत्यसंस्काराला पुतण्या व भावा बरोबर होते. पुतण्याचा आणि भावाचा जेवढ्यास तेवढाच संबंध होता. पण माझे बाबा 'हिरो' ..पुतण्या 'व्हिलन' ..मग कोर्टात हिंदी सिनेमा इष्टाईल आरोप-प्रत्यारोप होऊन बाबा जिंकले ..असं व्हायला आयुष्य काही हिंदी सिनेमा थोडाच होता? 😄
कोर्टात काहीही होऊ शकतं. केस कितीही वर्ष चालू शकते. जेव्हा मांजरेकरला अटॅक आला तेव्हा काम बंद होतं, लंच ब्रेक होता. त्या दिवशी मुळातच कामाला हातही लावला नव्हता मांजरेकरांनी. अर्धा दिवस उलटला आहे..रोज पूरा मिळणार नाही , तुम्ही आराम करा , उद्या या ...वगैरे संवाद सर्वां समक्षच झाला होता. ही बाबांसाठी मोठी जमेची बाजू होती. तरीही मनस्ताप टाळण्यासाठी समझौता करण्यावर भर द्यायचं ठरलं.
पुतण्याने मागितलेली रक्कम देणं तर निव्वळ अशक्य अशक्यच होतं. बाबांना जीवाला तोच घोर लागून राहीला होता. दोन्ही मुलींची शिक्षणं बाकी , आई तर निवृत्ती घेऊन बसली होती! व्यवसायाचा पसारा मांडला होता. दिवसा गणिक गरजा वाढत होत्या.. महागाई वाढत होती.
त्यांचं मनस्वास्थ्य साफ बिघडलं. ते पूर्ण नास्तिक होते वा काय मला माहित नाही ..पण जप , नामस्मरण केल्याने आणि देवाचा धावा केल्याने संकट टळत नाही हे ज्याला पक्कं ठाऊक आहे ..असा प्रचंड practical माणूस होता तो!!! अशा प्रसंगात देवावर विश्वास नसणाऱ्यांची खूप खूप मोठी परीक्षा असते. सगळी कडून आधारच नाहिसा होतो ...ज्या स्वत:वरच्या दूर्दम्य विश्वासावर सगळं उभं केलेलं असतं तो विश्वासच जर हलला गेला तर काय होईल?
त्यांची सिगरेट वाढली , चहा वाढला. वजन घटलं , केसही पांढरे होऊ लागले भरभर. कोणा कोणाला चालल्या प्रकाराची कुणकुण लागली की त्यांचे चौकशी ला फोन येत. असे फोन घेतले , बोललं की त्यांना अधिकच नैराश्य येई.
गोवर्धनदास काकांच्या सल्ल्या प्रमाणे ते रोजच दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना लिहून ठेवत होते. मग बाबांनी त्याच चोपडीच्या (बिझनेसवाले लोक बरेचदा वही ला (notebook) 'चोपडी' म्हणतात.😄 ) शेवटच्या पानावर स्वत: साठी काही तरी सकारात्मक लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ : माझ्यावर पाच पैशांचही कर्ज , उधारी आज घडीला नाही.
Yess ..😀 this was a positive thought 👍
मग यात भर पडू लागली , माझा भाऊ माझी बहीण मला धीर देतात. माझी बरीचशी माणसं (😢) अजूनही माझ्या बरोबर आहेत...
माझी पत्नी समजूतदार आहे, माझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे.
मुली शिक्षणात हुशार आणि समंजस आहेत. वगैरे!!
त्यांनी या काळात 'positive thinking'. या विषयावरील पाच पंचवीस पुस्तकं वाचून काढली. सतत मनाला उभारी मिळावी म्हणून जे करता येईल ते केलं. आम्हाला 'लघुरुद्र घाला , उपवास धरा , गुरू शोधा' असे पुष्कळ सल्ले मिळाले. आई-बाबांनी या प्रेमळ सल्ला देणाऱ्यांची मने कधीच दुखावली नाहीत पण आई म्हणते ..आमचं अशा गोष्टींत मनच रमलं नाही..कराव्याशा वाटल्याच नाहीत तर जूलुमाचा रामराम हवा कशाला? नाही म्हणायला आई दर शुक्रवारी काळ्या रामाच्या देवळात तेवढं जायची. एक गजरा देवीला वहायची.
बऱ्याच मिटिंगज् झाल्या. गोवर्धनदास यांचे स्नेही हुशार होते. त्यांनी एका फार मोठ्या आणि नावाजलेल्या वकिलांच्या वांद्रे येथील मोठ्या आॅफिस मधे फायनल मिटिंग ठरवली. पुतण्या , त्याचा वकील , बाबा आणि ते स्नेही असे मिटिंगला गेले. बाबा म्हणाले...तो माणूस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास!! एक एक करत तो पुतण्याच्या वकीलांशी कायद्याच्या अगम्य भाषेत बोलत होता...त्यांना निरुत्तर करत होता.कोर्टात जाणं तुम्हाच भारी पडेल , त्यापेक्षा अनुकंपा म्हणून खरे देऊ करत असलेली रक्कम चर्या निवांत !! हे सहज गळी उतरत होता त्यांच्या!! त्या कायदेशीर भाषेतलं मला काही जरी कळत नव्हतं तरी मला अचानकच अवघड पेपर सोप्पा वाटायला लागला! इतके दिवस उगाच मी चिंता केलीसं वाटून मला मानेवर केस उभे राहिले. माझ्या ही नकळत माझे ओठ छोटं हसू येऊन ताणले गेले आणि डोळेही चुरचुरीत होते! 😄
पुतण्या व त्याचा वकील तोंड पाडून होते पण तरी पैशांवर तडजोड ही केलीच त्यांनी!! पाच लाखावरून थेट पन्नास हजारांवर 😂😂 त्यांनी सगळं आवरतं घेतलं.
वांद्र्याच्या या (बहुतेक कुलकर्णी साॅलिसिटर्स ..नाव नक्की आठवत नाही) वकीलांनी या तीन तासांच्या मिटिंगची सात हजार रुपये फी घेतली. 😄
बाबांनी मग काही दिवस चक्क नोकरी केली ...त्यांच्या माणसां सकट त्यांना नोकरी दिली तरी कोणी? मग तिथे पुढला वाढदिवस कसा साजरा झाला? 😂😂😂 हा किस्सा ऐकायचा आहे का तुम्हाला?
#PradnyaSubodhAhire.