#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग११
बाबा, काळेले दोघं धावत फाटकातून आत गेले. गोवर्धनदास यांनी गेट जवळच्या इंटरकाॅम वरुन वरच्या office मधे काॅल केला आणि कंपनीचा डाॅक्टर बोलवा वगैरे सांगून मेन officer ना पण काय झालं ते कळवलं!!
बाबांना माणसांनी सांगितलं की सगळे बसले , बोलत होते आणि एकदम मामा छाती दुखते दुखते करत आडवा झाला. तोंडावर पाणी मारलं , हात चोळले ... काही उपयोग नाही. बाकी officer , कंपनी डॉक्टर येऊन पटापट ambulance बोलाऊन पुढच्या वीसेक मिनीटात जवळच्या हाॅस्पिटल मधे नेलं. तिथे डाॅक्टरांनी सांगितलं की काही करता येणार नाही. मॅसिव्ह हार्टअटॅक...आॅन द स्पाॅट गेले. 😑
सगळं वातावरण पालटलं. वाईट वाटतं होतं , मांजरेकर मामांच्या घरी कळवायचं तर फोन वगैरे नव्हता. बाबांनी त्यांच्याच दोन माणसांना स्वत: घरी जाऊन निरोप द्यायला पाठवलं.
कंपनीतले officer , पोलिस , गोवर्धनदास सर , हाॅस्पिटल , डेथ सर्टिफिकेट देतानाचे सोपस्कार या सगळ्यात बाबांचा उरलेला वाढदिवस संपून गेला. मांजरेकरचा पुतण्या , भाऊ आणि काही जण आले. सगळे विधीवत आटोपून "काही लागलं तर कळवा" सांगून बाबा एकदाचे घरी निघाले.
गोवर्धनदास साहेब दुपार पासून बाबांसोबतच होते. त्यांनी बाबांना स्वत:च्या गाडीने घरा पर्यंत सोडलं. तू खूप जास्त काळजी करतोस खरे ! आणि खूप चूकीच्या ठिकाणी ओवर रिएक्ट पण करतोस. एवढा नरम दिल कामाचा नाही. जे झालं त्यात तुझा काय मिस्टेक आहे का? मऊ लागलं की लोक कोपराने उकरणार! तुला कसली गरज लागली तर मला सांग. आणि आज पासून एक एक गोष्ट जी होते , कोणाचा काॅल आला , कोण तुला काय बोलला ...एव्हरीथिंग तू नोट डाऊन कर.
असे चमत्कारीक सल्ले गोवर्धनदास साहेबांनी का द्यावेत ? हे समजण्या एवढी शारीरिक, मानसिक शक्ती बाबांना नव्हती. ते दुपारपासून उपाशी , उभ्या-उभ्याच धावपळ , चिंता , मदत सगळंच करत होते. मोठा सुस्कारा सोडत आणखी एक सिगरेट पेटवत ते म्हणले "मी जरा जास्तच कडक सूनावलं मांजरेकरला" ते ऐकल्या बरोबर गोवर्धनदास साहेब ताडकन उठून बोलले , तू हे वाक्य आयुष्यात परत एकदा जरी बोललास तरी तू , तुझं संसार , तुझी पत सगळं डूबवशील. माझं ऐक पोरा ...एकच लक्षात ठेव .. जिंदगी कोणाच्या हातात नसते. जे झालं त्यात तुझी काही चूक नाही हे दिमागमधे फिट्ट कर.
त्यांनी आईला त्याच सूचना दिल्या की कोणाचा फोन आला गेला वगैरे गोष्टी नोंद करून ठेवा. आईने विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं का? कशासाठी करायचंय , बुवा काय होणार आहे? त्यावर साहेब म्हणाले की काही झालं नाही तर चांगलंच आहे. मग हसून , गप्पा मारून , मला काजू चिक्की चं पाकीट देऊन ते गेले.
मी तर फार लहान होते ....ताई माझ्या हून सहा-सात वर्षे मोठी !! तिला गांभीर्य कळलं होतं. आई पण चिंतेत होती. बाबा मात्र रात्री थकून असे काही झोपले होते ...अगदी घोडे बेचके👍
पुढले दोन-तीन महिने तरी ही अशी गाढ झोप त्यांच्या वाट्याला आली नाही. ...असं आई सांगते. बाबा या काळाबद्दल बोलायचे किंवा सांगायचे तेव्हा समुद्रसफर करून सुखरूप घरी पोहोचलेला सिंदबाद असाच दिसला असेल असं मला वाटायचं 😄
शनिवार , रविवार गेला !! सोमवारी संध्याकाळी मांजरेकरच्या पुतण्याचा फोन आला ....त्याने बाबांवर आणि कंपनी वर केस करणार आहे ..असं कळवलं !! सगळं सामोपचाराने व्हावं असं वाटतं असेल तर आधी मिटिंग करूया असं म्हणाला !! 🙁
या फोन नंतर बाबांनी सर्वात आधी गोवर्धनदास साहेब आणि नंतर गजूकाका (बाबांचा सख्खा मोठा भाऊ) यांना फोन करून घडलेल्या गोष्टी सांगितल्या. पुढले काही दिवस बाबांचं सगळंच .. सुख , चैन , केलेली चांगली कर्म , पूर्वसंचित (याच जन्मातली) , नातेवाईक , मैत्र ...सगळंच पणाला लागलं.
कसं काय घडल्या पुढच्या गोष्टी? कोर्ट-कचेरी झाली की नाही? केस नक्की काय केली गेली? त्यातनं रस्ते कोणी कसे काढले? ...वाचत रहा.
#PradnyaSubodhAhire
#भाग११
बाबा, काळेले दोघं धावत फाटकातून आत गेले. गोवर्धनदास यांनी गेट जवळच्या इंटरकाॅम वरुन वरच्या office मधे काॅल केला आणि कंपनीचा डाॅक्टर बोलवा वगैरे सांगून मेन officer ना पण काय झालं ते कळवलं!!
बाबांना माणसांनी सांगितलं की सगळे बसले , बोलत होते आणि एकदम मामा छाती दुखते दुखते करत आडवा झाला. तोंडावर पाणी मारलं , हात चोळले ... काही उपयोग नाही. बाकी officer , कंपनी डॉक्टर येऊन पटापट ambulance बोलाऊन पुढच्या वीसेक मिनीटात जवळच्या हाॅस्पिटल मधे नेलं. तिथे डाॅक्टरांनी सांगितलं की काही करता येणार नाही. मॅसिव्ह हार्टअटॅक...आॅन द स्पाॅट गेले. 😑
सगळं वातावरण पालटलं. वाईट वाटतं होतं , मांजरेकर मामांच्या घरी कळवायचं तर फोन वगैरे नव्हता. बाबांनी त्यांच्याच दोन माणसांना स्वत: घरी जाऊन निरोप द्यायला पाठवलं.
कंपनीतले officer , पोलिस , गोवर्धनदास सर , हाॅस्पिटल , डेथ सर्टिफिकेट देतानाचे सोपस्कार या सगळ्यात बाबांचा उरलेला वाढदिवस संपून गेला. मांजरेकरचा पुतण्या , भाऊ आणि काही जण आले. सगळे विधीवत आटोपून "काही लागलं तर कळवा" सांगून बाबा एकदाचे घरी निघाले.
गोवर्धनदास साहेब दुपार पासून बाबांसोबतच होते. त्यांनी बाबांना स्वत:च्या गाडीने घरा पर्यंत सोडलं. तू खूप जास्त काळजी करतोस खरे ! आणि खूप चूकीच्या ठिकाणी ओवर रिएक्ट पण करतोस. एवढा नरम दिल कामाचा नाही. जे झालं त्यात तुझा काय मिस्टेक आहे का? मऊ लागलं की लोक कोपराने उकरणार! तुला कसली गरज लागली तर मला सांग. आणि आज पासून एक एक गोष्ट जी होते , कोणाचा काॅल आला , कोण तुला काय बोलला ...एव्हरीथिंग तू नोट डाऊन कर.
असे चमत्कारीक सल्ले गोवर्धनदास साहेबांनी का द्यावेत ? हे समजण्या एवढी शारीरिक, मानसिक शक्ती बाबांना नव्हती. ते दुपारपासून उपाशी , उभ्या-उभ्याच धावपळ , चिंता , मदत सगळंच करत होते. मोठा सुस्कारा सोडत आणखी एक सिगरेट पेटवत ते म्हणले "मी जरा जास्तच कडक सूनावलं मांजरेकरला" ते ऐकल्या बरोबर गोवर्धनदास साहेब ताडकन उठून बोलले , तू हे वाक्य आयुष्यात परत एकदा जरी बोललास तरी तू , तुझं संसार , तुझी पत सगळं डूबवशील. माझं ऐक पोरा ...एकच लक्षात ठेव .. जिंदगी कोणाच्या हातात नसते. जे झालं त्यात तुझी काही चूक नाही हे दिमागमधे फिट्ट कर.
त्यांनी आईला त्याच सूचना दिल्या की कोणाचा फोन आला गेला वगैरे गोष्टी नोंद करून ठेवा. आईने विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं का? कशासाठी करायचंय , बुवा काय होणार आहे? त्यावर साहेब म्हणाले की काही झालं नाही तर चांगलंच आहे. मग हसून , गप्पा मारून , मला काजू चिक्की चं पाकीट देऊन ते गेले.
मी तर फार लहान होते ....ताई माझ्या हून सहा-सात वर्षे मोठी !! तिला गांभीर्य कळलं होतं. आई पण चिंतेत होती. बाबा मात्र रात्री थकून असे काही झोपले होते ...अगदी घोडे बेचके👍
पुढले दोन-तीन महिने तरी ही अशी गाढ झोप त्यांच्या वाट्याला आली नाही. ...असं आई सांगते. बाबा या काळाबद्दल बोलायचे किंवा सांगायचे तेव्हा समुद्रसफर करून सुखरूप घरी पोहोचलेला सिंदबाद असाच दिसला असेल असं मला वाटायचं 😄
शनिवार , रविवार गेला !! सोमवारी संध्याकाळी मांजरेकरच्या पुतण्याचा फोन आला ....त्याने बाबांवर आणि कंपनी वर केस करणार आहे ..असं कळवलं !! सगळं सामोपचाराने व्हावं असं वाटतं असेल तर आधी मिटिंग करूया असं म्हणाला !! 🙁
या फोन नंतर बाबांनी सर्वात आधी गोवर्धनदास साहेब आणि नंतर गजूकाका (बाबांचा सख्खा मोठा भाऊ) यांना फोन करून घडलेल्या गोष्टी सांगितल्या. पुढले काही दिवस बाबांचं सगळंच .. सुख , चैन , केलेली चांगली कर्म , पूर्वसंचित (याच जन्मातली) , नातेवाईक , मैत्र ...सगळंच पणाला लागलं.
कसं काय घडल्या पुढच्या गोष्टी? कोर्ट-कचेरी झाली की नाही? केस नक्की काय केली गेली? त्यातनं रस्ते कोणी कसे काढले? ...वाचत रहा.
#PradnyaSubodhAhire
No comments:
Post a Comment